विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Thursday, 26 September 2024

विद्यार्थ्यांसह शाळा ही घडवणारे सुनील अडगळे गुरुजी

 शाळेच्या चार भिंती मधील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरेसं नसतं. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत म्हणून तर शिक्षकांनी सतत भविष्याचा वेध घेणारं सोबतच स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवणारं शिक्षण द्यायला हवं. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणं हे तर आपलं पहिलं कर्तव्य आहेच पण सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या शिक्षणाची ही तितकीच गरज आहे.अशाच प्रकारे विविध सामाजिक विषय घेत वक्तृत्वाच्या माध्यमातून

  झोकून देऊन कष्ट करणारेआणि सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणारे पंढरपूर तालुक्यातल्या जाधववाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुरुजी सुनिल अडगळे. 

    गुरुजींनी अगोदर याच तालुक्यातील 

रानमळा-भोसे सारख्या छोट्या वस्तीवरील शाळेमध्ये सेवेची सुरुवात केली. पालकांच्या विश्वासावरती, विद्यार्थ्यांच्या अत्युच्च गुणवत्तेमुळे लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा विकास केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात "उत्कृष्ट शाळा" या पुरस्कारानं शाळेचा गौरव ही झाला. या छोट्या शाळेत स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले.

मुख्याध्यापक बळीराम माळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा प्रचंड कायापालट झाला.हे सर्वांच्या लोकसहभाग सहकार्यामुळेच...!!

पांढरेवस्ती करकंब या शाळेत बदली झाल्यानंतर विद्यार्थी आणि शाळा घडवण्याचं एक व्यसनच गुरुजींना लागलं आणि शाळेला 'एकही दिवस सुट्टी न घेता' दिवाळी-उन्हाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करुन अखंडपणे ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा विक्रम केला. लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला.याची दखल विविध वर्तमानपत्रे आणि ए बी पी माझा या टीव्ही चॅनेलनं घेतली.शाळा आणि गावाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड नावलौकीक झाला.

पांढरेवस्ती शाळेतच एका वर्षी "स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकल्याशिवाय... पायात चप्पलच घालणार नाही..!" अशी प्रतिज्ञा केली.वर्षभर उन्हाळ्या-पावसाळ्यात अनवाणी पायानं फिरत गुरुजी काम करत राहिले.परंतु शेवटी जिद्दीला यश आलं.तीन विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत चमकले,दोन विद्यार्थी नवोदयला आणि एक विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनला पात्र झाला. यावेळी मुख्याध्यापक मोहन रसाळ , आणि सुनिल बारेकर आणि पालकांचेही प्रचंड सहकार्य लाभलं.

भोसे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही गुरुजींनी लोकसहभागातून मोठं काम केलं.

 आज जि.प.शाळा जाधववाडी सारख्या आदर्श शाळेमध्ये दोघेही पतीपत्नी शिक्षक म्हणून सेवा करतात.

वक्तृत्व स्पर्धा , व्याख्याने,कवी संमेलन, पथनाट्य, शिक्षकांना मार्गदर्शन, सामाजिक कार्यशाळा, असे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळं त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

महापुरात ज्यांचं दप्तर वाहून गेलं त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, महामारीच्या काळात ज्यांची घर उध्वस्त झाली त्यांना आर्थिक सहाय्य, जीवनावश्यक वस्तूं, औषधे कपडे-पांघरुन यांचे वाटप केलं 

स्वच्छता, वृक्ष लागवड या सारखे सामाजिक कार्य ही त्यांनी केलं आहे.


चौकट: सलग तीनशे पासष्ट दिवस शाळा भरवली. विविध संस्थांचे असंख्य पुरस्कार गुरुजींनी मिळवले. शिष्यवृत्ती आणि लोकसहभाग खूप मोठ्या प्रमाणात जमा केला.राज्यभर वक्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं महत्त्वाचं काम गुरुजींनी केलं.वेदनेतून सुखाकडे, मुक्त विचार,चला वक्तृत्व स्पर्धा जिंकूया या तीन पुस्तकांचे लेखन ही केले आहे.

No comments:

Post a Comment