व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत माणसाचं जसं शिक्षण,समाज,आणि कुटुंब महत्त्वाचं ठरतं तसंच परिस्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते . राहुल सुरवसे यांच्या जीवनात सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थितीच शिक्षक होण्याच्या प्रेरणेचं उगम स्थान ठरली. घरची शिक्षण पूर्ण करण्याइतकीही ऐपत नसल्यानं मोठया काका काकूंनी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली .
उपशिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे हिप्परगे येथे त्यांनी 15 वर्षे सेवा केली. के यान प्रोजेक्टर ते मोबाईल संगणक बस असा त्यांचा अद्वितीय प्रवास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक ठरला. याच काळातील शैक्षणिक कार्यानिमित्त त्यांना शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग असा डॉ. मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकुतांडा, तालुका उत्तर सोलापूर येथे त्यांनी 7 वर्षे सेवा केली. प्रिसिजन फाउंडेशन आणि सर फाउंडेशन यांच्या सहकार्यानं शाळा डिजिटल स्मार्ट झाली. सोलर पॅनलयुक्त, टॅब स्कूल अशी उल्लेखनीय शाळेची ओळख सोलापूर जिल्ह्यात झाली. त्यामुळे गुजरात आणि राजस्थान येथून संचालक साहेब आणि अधिकारी यांच्या शाळेस भेटी झाल्या. विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला. डिजिटल शैक्षणिक क्रांती ज्यांच्यामुळे झाली असेल संदीप गुंड सर यांनी शाळेस भेट दिली.लोकुतांडा शाळेतील पाचवीतील दोन विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले. त्या काळात जि.प. सोलापूर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. सहा वर्षात तीन वेळा वार्षिक स्नेह संमेलन घेवून द्विशिक्षकी शाळेत सुद्धा रु.एक्कावन्न हजाररुपये लोकसहभाग जमा केला.. कोरोना काळात राबविलेले उपक्रम पाहून राज्यस्तरावर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत वेबिनार द्वारे सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळाली.त्यातील समाजमंदिरातील भोंग्याद्वारे शिक्षण हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरला.शाळेत विविध उपक्रम, डिजिटल शिक्षणावर अधिक भर देत अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक रंजक करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याही शाळेत त्यांनी जवळजवळ सत्तर हजार रुपये पर्यंत लोकसहभाग जमवून शाळेच्या भौतिक गरजा व आधुनिक तंत्रज्ञानासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला.
सतत नवीन अध्यापन पद्धती आणि जुनी अध्यापन पद्धती यांचा मेळ घालत अध्यापनात नवनवीन प्रयोग करत राहणं हे त्यांना लागलेलं शिक्षणाचं वेडच! प्राथमिक शिक्षकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांची बदली . आता गुरुजींची बदली जि.प.शाळा गुळवंची येथे झाली. नवीन शाळेत नावीन्यपूर्ण असं काय करता येईल ? हा विचार मनात येत असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरीय व्हर्चुअल क्लास ई-बालभारती मध्ये त्यांची निवड झाली. इयत्ता पहिली इंग्रजी आणि इयत्ता चौथी परिसर अभ्यास विषयाचे पाठ घेण्यासाठी त्यांना संधी मिळाली. कोरोना काळात जिल्हा परिषद सोलापूर युट्युब चॅनल साठी पूर्वी केलेल्या कामाचा अनुभव याठिकाणी त्यांना उपयोगी पडला . वर्गातलं अध्यापन अधिक आनंददायी होण्यासाठी साहित्याचा वापर, तंत्रज्ञानाचा अवलंब, कृती, उपक्रम, स्वाध्याय, स्वयं अध्ययन यांचा देखील येथे विचार करावा लागला. राज्यातील सॅटेलाईट वरून जोडल्या गेलेल्या ७६१ शाळांना यूट्यूब लाईव्ह पाहण्याची संधी ई बालभारतीने त्यांना उपलब्ध करून दिली. राज्यातील शिक्षकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा करता आली.
इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्याना सर्व विषय व्हर्चुअल क्लास रूपानं या एकाच मंचावरून शिकण्याची सुवर्ण संधी विद्या परिषदेनं उपलब्ध करून दिली. आजपर्यंत 26 वर्षाच्या सेवेत त्यांनी वस्तुरूपानं आणि रोख स्वरुपात मिळून जवळ जवळ 14 लाख रुपयांचा लोकसहभाग मिळवला. याशिवाय प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इंग्रजी अभ्यास मंडळा मध्ये ते सदस्य आहेत .
बालभारती च्या इयत्ता १ली, २ री व ३ री इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली.
कॉन्व्हर्सेशन स्किल,माझे शैक्षणिक साहित्य लॅंग्वेज गेम्स, अशा पुस्तकांचं लेखन सुद्धा त्यांनी केलं आहे..ई लर्निंग , स्वयंअध्ययन साहित्य , डिजिटल शाळा, भाषिक खेळ, उपक्रम यातून रंजक अध्ययन अध्यापन.
.शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तर विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ उपसमिती सदस्य म्हणून राज्यस्तरावर त्यांची निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment