शिक्षणक्षेत्रात सतत नव्या वाटा शोधाणारा हरहुन्नरी शिक्षक... !
प्रयोगशीलतेला अमाप संधी असलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची मालिका निर्माण करणारे, उत्तम वक्तृत्व शैली, निवेदनाची आवड, हस्ताक्षराची देणगी, आणि सुमधुर आवाज, उत्तम शिस्त, कार्यक्रमातला काटेकोरपना, प्रशासनावरची भिस्त अशा सर्व अंगांनी काम करणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व, माढा तालुक्यातील सोलंकरवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील सृजनशील शिक्षक रामकृष्ण केदार गुरुजी
स्पर्धा परीक्षांमध्ये हातखंडा असलेल्या केदार यांचे अद्यापपर्यंत विविध शाळांमध्ये नवोदय मध्ये 4 विद्यार्थी तर शिष्यवृत्ती मध्ये 15 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धांमध्ये जिल्हास्तरापर्यंत सातत्यानं यश मिळवले आहे.
जिल्हा परिषद शाळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशानं अरण व मोडनिंब सारख्या सर्वात जास्त पटाच्या शाळा आय एस ओ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे मुक्त शिक्षण घेता यावं म्हणून यांनी मोडनिंबच्या शाळेमध्ये 'मुक्तांगण' हा प्रकल्प राबवला.शिक्षक म्हणून नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असतानाच त्यांच्याकडे मोडनिंब केंद्राच्या केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी आली . या कालावधीत त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांनी राबविले. शाळेच्या भौतिक व इतर अडीअडचणी दूर करून शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक,मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचा समन्वय घडवत शाळेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी 'महसूल गावसभे' सारखा उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला. त्या माध्यमातून केंद्रातील सर्व शाळांमध्ये लाख रुपयाचा निधी संकलनासह भौतिक सुविधांनी शाळा संपन्न झाल्या.
बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासासाठी विविध कृती कार्यक्रमाची रेलचेल असणारा मुक्तांगण यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत 'सर फाउंडेशन सोलापूर'ने त्यांना राज्यस्तरीय नवोपक्रमशील अधिकारी व नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मानित केले.
लॉकडाऊननंतर विद्यार्थी मूलभूत क्षमतेमध्ये मागे पडत आहेत असे लक्षात आल्यानंतर त्यांनी समूह साधन गटाच्या माध्यमातून ध्यास गुणवत्ते सारखा उपक्रम प्रभावीपणे राबवला...या उपक्रमाला स्पर्धात्मक स्वरूप देऊन शिक्षकांमध्ये स्पर्धा निर्माण केली.
त्यांनी केंद्र स्तरावर सुरू केलेल्या 'मिशन स्कॉलरशिप' या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि शिष्यवृत्तीला केंद्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी झाले.
आमच्यासाठी आम्हीच या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक संख्या कमी असलेल्या शाळेवर पालक सहभाग व शिक्षक सहभागाच्या माध्यमातून स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली.या विविध उपक्रमांबरोबरच शाळा स्तरावरील एक मूल एक झाड, अभ्यासाचं गाव सोलंकरवाडी,प्रभावी गुणवत्ता कक्ष,आदर्श समूह साधन केंद्राची निर्मिती असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे पूर्ण केले. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी सुद्धा त्यांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले होते.
जिल्हा परिषद शाळा सोलंकरवाडी येथे शाळेचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त अमृत महोत्सव शुभारंभ,निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा,विद्यार्थी विकास निधी संकलन योजना,अभिनव अमृत कलश योजना मेळावा,माता-पिता पाद्यपूजन, माजी विद्यार्थी मेळावा, लेकीचं घर,असे विविध उपक्रम शाळेत सुरू असून त्यांनी ग्रामस्थ व शिक्षक यांच्या सहकार्यानं विविध संस्था व विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करत शाळा डिजिटल केली आहे. रोख व वस्तूरूपाने जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा शैक्षणिक उठाव यावर्षी त्यांनी जमा केला आहे. गड किल्ले ट्रेकिंगची त्यांना आवड आहे. 125 पेक्षा जास्त किल्ले ट्रेकिंग पूर्ण झाले आहे. पूर्णगायन,वादन, कविता करणं इत्यादी स्वतःचे छंद देखील जोपासले आहेत.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीआदर्श शिक्षक पुरस्कार ,
कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार छत्रपती परिवार मरवडे, आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती कुर्डवाडी,
राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार, मुक्तांगण प्रकल्प सर फाउंडेशन सोलापूर यांचा पुरस्कार.
No comments:
Post a Comment